वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मा. पालकमंत्री श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी २१ विभागाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हा नियोजन समितीचा सर्व निधी खर्च झाल्याची माहिती या बैठकीत सांगण्यात आली.तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेल्या सर्व कामांचे
काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व कामाचे व्हिडीओ सर्व विभागप्रमुखांनी सादर करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला मा. पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी दिले.