लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुतीची सभा मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर महात्मा गांधीजींच्या वर्धा नगरीत पार पडली. या विराट
सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी समस्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत जनतेला संबोधित केले.
सोबतच देशभरातील कार्यकर्त्यांशी व्हीडिओ कॉन्फरसिंग द्वारे संपर्क साधला चौकीदार हा गणवेशाशी संबंधित नसून ती एक भावना आहे असे मत त्यांनी प्रकट केले. २०१४ पासून पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भ्रष्टाचाराविरुद्ध मा.नरेंद्रजी मोदींनी मोहीम हाती घेतली. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी तात्काळ कारवाई केलीे गेली. जे गुन्हेगार देशाबाहेर आहेत त्यांना भारतात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. देशाला वडिलोपार्जित संपत्ती मानणाऱ्यांना एक साधारण चहावाला देशाचा प्रधानमंत्री झालेलं आजही रुचलेलं नाही.